『Life of Stories』のカバーアート

Life of Stories

Life of Stories

著者: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
無料で聴く

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
アート 文学・フィクション
エピソード
  • # 2060 : रामायणातील मंथरा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/06/14

    Send us Fan Mail

    कैकयच्या अश्वपती सम्राटाची मुलगी कैकेयी राजा दशरथांची तिसरी बायको होती. ती खूपच देखणी आणि साहसी देखील होती. कदाचित या कारणामुळेच राजा दशरथांचे तिच्यावर जास्त प्रेम होते. लग्नानंतर पाठराखीण म्हणून कैकेयीची ही दासी तिच्यासोबतच अयोध्येस आली होती.
    राणी कैकेयी आणि दासी मंथरा ह्या दोघी कैकय देशातील होत्या. मंथरा, राणी कैकेयीची लहानपणापासुन परिचयाची व अतिशय विश्वासू दासी होती. कैकेय देशाच्या राजा अश्वपती यांचा एक भाऊ होता, ज्याचे नाव बृहदश्व होते. त्याला एक मोठ्या डोळ्यांची मुलगी रेखा नावाची मुलगी होती. ती लहानपणापासूनच कैकेयीची मैत्रीण होती. ती राजकन्या तर होतीच त्याच बरोबर बुद्धिवान सुद्धा होती. लहान वयातच तिला एक आजार झाला. या आजारात तिचं सर्वांग घामाने चिंब व्हायचे, त्यामुळे तिला खूप तहान लागायची.

    続きを読む 一部表示
    9 分
  • # 2059 : पाताळलोक. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/06/12

    Send us Fan Mail

    वामन अवतार कथेत बळीराजाकडे श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. बळी त्यांना तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. मग वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापल्यावर आता “तिसरे पाऊल कोठे ठेवू?” असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करून शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो.

    続きを読む 一部表示
    10 分
  • # 2058 : काय असते पाण्याची एक्सपायरी डेट..? ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    2026/06/08

    Send us Fan Mail

    पृथ्वीवरील पाण्याचा साठा सुमारे ४.५ अब्ज वर्षे जुना आहे. हा पाण्याचा साठा अगदी आपल्या सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि तो थेट सूर्यापेक्षाही जुना असू शकतो.
    पृथ्वीवर पाणी कसे आणि केव्हा आले?
    संशोधकांच्या मते, पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच धूमकेतू आणि लघुग्रहांच्या माध्यमातून हे पाणी पृथ्वीवर आले. पृथ्वी ही एक 'बंदिस्त' (Closed) सिस्टीम आहे, म्हणजेच नवीन पाणी बाहेरून येत नाही आणि इथले पाणी अंतराळात जात नाही. कोट्यवधी वर्षांपासून हेच पाणी बाष्पीभवन, पाऊस आणि नद्यांच्या माध्यमातून पुन्हा-पुन्हा फिरत आहे.

    続きを読む 一部表示
    7 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません